विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही प्राथमिकता - प्रा.वर्षा गायकवाड

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही प्राथमिकता - प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, : कोरोनाची सध्याची परिस्थिती आजारांचा मुलांवर होणारा वाढता प्रादुर्भाव आणि परीक्षेचा संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षा ऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा तसेच केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसुत्र धोरण निश्चित करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करता केंद्रसरकारने CBSE ची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे. मुलाच्या शैक्षणिक जीवनातील बारावी परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. या पुढे महाराष्ट्र शासन ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत ही विद्यार्थ्यांचे आरोग्य हित जोपासून लवकरच निर्णय घेईल. घरी रहा काळजी घ्या.