बारावीच्या परीक्षेबाबत ३१ मे रोजी सुनावणी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : करोना संसर्गामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सर्वोच्च न्यायालय ३१ मे रोजी सुनावणी करणार आहे.
न्या. ए.एम खान व न्या. दिनेश माहेश्वरी यांच्यापुढे याचिकेची सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर याचिकाकत्र्या ममता शर्मा यांनी त्यांच्या याचिकेची प्रत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला दिली आहे की नाही याची विचारणा न्यायालयाने केली. त्यावर शर्मा यांनी म्हटले आहे, की आपण संबंधितांना याचिकेची प्रत उपलब्ध करणार आहोत. नंतर न्यायालयाने ही सुनावणी ३१ मे रोजी करण्याचे म्हटले आहे. सीबीएसइ व कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या दोन संस्थांसह केंद्राला याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.
सुनावणीवेळी माहेश्वरी यांनी सांगितले, की सीबीएसइ या मुद्द्यावर १ जून रोजी निर्णय घेणार आहे. कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या संस्थेच्या वकिलांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालय याचिकेवर सुनावणी करणार असून उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करू नये. याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले, की त्यांनी स्वत:हून या प्रश्नाची दखल घ्यावी.