पावसाला अक्कल नसल्याचे म्हणत केदार शिंदे यांची मुंबई पालिकेच्या कारभारावर टीका
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने सामान्य नागरिक आणि विरोधी पक्षासह कलाकारांनी देखील बीएमसीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील आपल्या मिश्किल अंदाजात ट्विटरच्या माध्यमातून बीएमसीवर निशाणा साधला.
'पावसाला एक अक्कल नाही. ५० मी मी पर्यंत संरक्षणाची व्यवस्था बीएमसीने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो', असे ट्विट करत केदार शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे बीएमसीच्या कारभारावर निशाणा साधला आहे. दरम्यान, केदार शिंदे यांच्या ट्वीटनंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत मुंबई पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला.
मुंबईत पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा प्रकारे दरवर्षी कलाकारांसह सर्वसामान्यांना पाणी तुंबण्याचे अनुभव येतच असतात. मुंबईतील परिस्थितीवरून विरोधकांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे.