करोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल; ‘आयसीएमआर’कडून दिलासा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल; ‘आयसीएमआर’कडून दिलासा

भारतात करोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्या लाटेइतकी तीव्र नसणार आहे असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (आयजेएमआर) प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार ही माहिती देण्यात आली आहे. गणिती मॉडेलच्या विश्लेषणावर आधारित, या अभ्यासाचा अंदाज आहे की लसीकरणामुळे तिसर्या लाटेचा संभाव्य उद्रेक कमी होईल.

या अभ्यासानंतर ४० टक्के लोकांनी दुसर्या लाटेच्या तीन महिन्यांतच दोन्ही डोस घेतले होते त्यानुसार हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. लसीकरणामुळे करोना संक्रमणाची तीव्रती ही ६० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. लसीकरणामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचाओधोका कमी होणार आहे अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

तिसऱ्या लाटेसंदर्भात चार गृहीतके विचारात घेता, अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की संसर्ग-आधारित प्रतिकारशक्ती कालांतराने कमी होऊ शकते. विषाणूमध्ये कोणताही बदल झाला नाही तर आधी करोनाची लागण झालेल्या लोकांना पुन्हा लागण होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत नवीन प्रकारचा विषाणूचा समावेश असू शकतो ज्यामुळे कोविड-१९चे मोठ्या प्रमाणात संक्रमण होऊ शकते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्यासाठी हा विषाणू सक्षम आहे.

यंत्रणेच्या अभ्यासात तिसऱ्या लाटेमध्ये विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी लॉकडाउनची अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. तसेच वेगवान लसीकरणामुळे भविष्यातील लाटा रोखण्यात यश येऊ शकते असे सांगण्यात आले आहे.