अखेर ‘तारक मेहता..’,सोडण्याच्या चर्चांवर मुनमुन दत्ताने सोडले मौन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अखेर ‘तारक मेहता..’,सोडण्याच्या चर्चांवर मुनमुन दत्ताने सोडले मौन

छोट्या पडद्यावरीलतारक मेहता का उल्टा चष्माही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्माही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपलं मनोरंजन करत आहे. ‘तारक मेहता..’ची संपूर्ण टीम दमन वरून चित्रीकरण संपवून मुंबईला आल्यापासून बबीता उर्फ मुनमुन दत्ता एक ही दिवस मालिकेच्या सेटवर आली नाही. एवढंच नाही तर तिने ही मालिका सोडल्याच्या चर्चांना उधान आलं होतं. आता मुनमुनने यावर एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

मुनमुनने नुकतीचईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुनमुननेतारक मेहता का उल्टा चष्माही मालिका सोडण्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या - दिवसांपासून काही गोष्टींना चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं आहे. यासगळ्याचा माझ्या आयुष्यावर वाईट परिणाम होतं आहे. लोक म्हणतं आहेत की मी मालिकेच्या सेटवर जातं नाही, हे खरं नाही. सध्या या शोमध्ये माझ्या उपस्थितीची गरज नाही. त्यामुळे मी सेटवर येत नाही,” असे मुनमुन म्हणाली.

पुढे मुनमुन म्हणाली, “या सगळ्या गोष्टी प्रोडक्शन हाऊस ठरवतं मी नाही. पुढची कहाणी काय असेल याचा निर्णय तेच घेतात. मी फक्त काम करते आणि माझं काम संपवून परत येते. त्यामुळे माझी गरज नाही तर मी नक्कीच सेटवर जाणार नाही.