म्हणून हार्दीक पंड्या गोलंदाजी करत नाही

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

म्हणून हार्दीक पंड्या गोलंदाजी करत नाही

मुंबई: आयसीसी टी20 विश्वचषक (T20 World Cup) जसजसा जवळ येत आहे, तसं संघात निवडण्यात आलेल्या खेळाडूंच्या फॉर्मची चर्चाही जोर धरु लागली आहे. यामध्येच सर्वांना चिंता लागून असलेला एक खेळाडू म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दीक पंड्या (Hardik Pandya). दरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर (MI vs PBKS) सहा गडी राखून विजय मिळवला. ज्या विजयात हार्दीकच्या धमाकेदार खेळीची झलक दिसली. त्याने 30 चेंडूत दमदार अशा नाबाद 40 धावा ठोकत सामना संपवला.

ज्यामुळे त्याचा फॉर्म परत येत असल्याची हमीतर मिळाली पण अष्टपैलू पंड्या अद्यापही गोलंदाजी करत नसल्याने त्यावर प्रश्न उठवले जात आहेत.दरम्यान मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा प्रशिक्षक महेला जर्यवर्धने (Mahela Jayawrdene) याने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पंड्याला सध्या गोलंदाजी करण्याकरता कोणतीच जबरदस्ती करण्यात येत नसल्याचं सांगत यामागील कारणही सांगितलं आहे.

टीम इंडियासाठी फलंदाजी महत्त्वाची

महेलाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत पंड्याच्या गोलंदाजीबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने सांगितलं, "हार्दिकने बऱ्याच काळापासून गोलंदाजी केलेली नाही. त्याच्या संपूर्ण खेळीवर आम्ही फार लक्ष देत आहोत. दरम्यान आगामी विश्वचषकात पंड्या चांगली कामगिरी करावा यासाठी त्याला कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती केली जात नसून संघासाठी सध्या त्याची फलंदाजी अधिक महत्त्वाची असल्याने त्याला गोलंदाजीसाठी फोर्स केला जात नाही.

अन्यथा शार्दूलला संधी

हार्दीकने पंजाब विरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली. ज्यानंतर अनेक टीकाकारांची तोंड बंद झाली आहेत. पण आयपीएलच्या उर्वरीत सामन्यातही हार्दीकने अशीच कामगिरी करने महत्त्वाचे आहे. अन्यथा हार्दिकच्या जागी भारतीय संघात मुंबईच्या शार्दुल ठाकूरची एन्ट्री होऊ शकते. सध्या राखीव खेळाडूंत नाव असलेल्या शार्दूलला थेट अंतिम भारतीय संघात स्थान मिळू शकतं. सध्या शार्दुल एकमेव भारतीय संघातील उत्तम वेगवान गोलंदाज आहे जो फलंदाजीही उत्तम करतो.