मराठा आरक्षणाच्या निकालाला याचिकाकर्ते विनोद पाटलांचे पुनर्विचार याचिकेद्वारे आव्हान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मराठा आरक्षणाच्या निकालाला याचिकाकर्ते विनोद पाटलांचे पुनर्विचार याचिकेद्वारे आव्हान

मुंबई / नवी दिल्ली, २० जून (हिं..) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला होता. त्यातील ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. याबरोबरच मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

 

राज्य सरकारने मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याआधीच विनोद पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालय या याचिकेची दखल घेते का? त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.