“आमिर आणि किरणने विभक्त होण्याचा निर्णय का घेतला…”, मित्राने केला खुलासा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“आमिर आणि किरणने विभक्त होण्याचा निर्णय का घेतला…”, मित्राने केला खुलासा

सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव चर्चेत आहेत. या चर्चा त्या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या. आमिर आणि किरणने लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता. आता आमिर आणि किरणच्या जवळचा मित्र अमीन हाजी याने त्यांच्या घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर वक्तव्य केले.

अमीन आणि आमिर हे जवळपास गेली २० वर्षे मित्र आहेत. त्यांनीलगानआणिमंगल पांडेया चित्रपटासाठी एकत्र काम केले. आता अमीननेदैनिक भास्करला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘मी यावर काय बोलू मला कळत नाही. पण कधीही दोन चांगल्या व्यक्ती एकत्र आयुष्य जगू शकत नाहीत हे मला कळालं आहे. आमिर आणि किरणने विभक्त होण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. मला नाही वाटत या दोघांमध्ये कामातील क्रिएविव्हीटीमुळे अंतर वाढत गेले असेल किंवा बौद्धिक पातळीवर काही जुळण्यासारखे घडले असेल. ज्यामुळे या दोघांच्या सुंदर नात्यात दरी निर्माण झालीअसे अमीन म्हणाला. लॉकडाउनच्या काळात आमिर आणि किरण यांच्यामध्ये मतभेद सुरु झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे अमीनने सांगितले. त्यानंतर आमिर आणि किरणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचे नाते, विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिले. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करूअसे आमिर आणि किरण या स्टेटमेंटमध्ये म्हणाले आहेत.