“लाज वाटली पाहिजे” म्हणत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला दिव्यांका त्रिपाठीचं उत्तर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
खतरों के खिलाडी ११’ हा शो सुरु झाला असून या शोमध्ये कलाकारांचे दमदार स्टंट पाहायला मिळत आहेत. मात्र असं असलं तरी शो सुरु झाल्यापासूनच विविध कारणांमुळे या शोने प्रेक्षकांची नाराजी ओढावून घेतली आहे. नुकतच या शोमध्ये सौरभ राज जैनचं एलिमिनेशन झालं असून चाहत्यांना मात्र हा निर्णय पटलेला नाही. अनेकांनी सौरभला पाठिंबा देत इतर अनेक कलाकारांवर संताप व्यक्त केलाय.
अर्जुन बिजलानी आणि निक्की तांबोळीनंतर काही प्रेक्षकांनी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीवर निशाणा साधला होता. मात्र आता टीका करणाऱ्यांना दिव्यांकाने सडेतोड उत्तर दिलंय. एका युजरने दिव्यांकाला ट्रोल केलं होतं. ” दिव्यांका खूप चतुर आहे. तिने आधी अर्जुन बिजलानीला पाठिंबा दिला आणि नंतर भोळी भाबडी बनत सौरभ जिंकण्यासाठी प्रार्थना करू लागली. लाज वाटली पाहिजे.”
युजरच्या या टीकेवर आता दिव्यांका त्रिपाठीने उत्तर दिलंय. ट्वीट करत ती म्हणाली, “डियर तसं तर मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही पण मला सौरभ आवडतो म्हणून मी सांगतेय. मी ते गमतीने म्हणाले होते. त्या आधी आणि नंतर देखील मी बरचं काही बोलले होते. जसं की तो शाकाहारी आहे वैगरे..पण ते दाखवलं गेलं नाही. (प्रसारणाच्या नियमांमुळे कदाचित ते दाखवलं गेलं नसेल) तुम्ही जे टीव्हीवर पाहता त्याहून बरचं काही जास्त घडलेलं असतं.” असं म्हणत दिव्यांकाने ट्रोल करणाऱ्याला उत्तर दिलंय. दिव्यांकाच्या या उत्तरावर सौरभ राज जैनने देखील एक ट्वीट केलं आहे. तो म्हणाला, “दिव्यांका तू माझ्याशी खूप चांगली वागलीस. जे काही झालं त्यानंतर केलेल तुझे स्वीट मेसेजेस माझ्या अजूनही लक्षात आहेत. आपल्या दोघांच्या भावना सारख्याच आहेत.”असं तो म्हणालाय.