पतीचे घर सोडून समांथा मुंबईत राहणार?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि पती नागा चैतन्यची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सध्या त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत की हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्यात आलेल्या या दुराव्यामुळे चाहते दु: खी आहेत, कारण या बातमीमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्या दोघांच्या चाहत्यांची फक्त एकच इच्छा आहे की ते दोघे लवकरच एकत्र आले पाहिजेत. मात्र, समांथा पती नागा चैतन्यपासून लांब मुंबईत राहणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर आता समांथाने प्रतिक्रिया दिली आहे.
समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक Q&A सेशन ठेवले होते. त्या दरम्यान तिने या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यावेळी एका नेटकऱ्याने तिला प्रश्न विचारला की तू मुंबईत राहायला जाणार आहेस का? त्यावर उत्तर देत समांथा म्हणाली, “मला कळत नाही की या अफवा कशा सुरु होतात? जशा इतर शेकडो अफवा पसरवल्या जात आहेत, तशीच ही सुद्धा एक अफवाच आहे. हैदराबाद माझं घर आहे आणि नेहमीच ते माझं घर राहील. हैदराबादने मला खूप काही दिलं आहे आणि मी अत्यंत आनंदाने इथे राहीन.”