'ताउक्ते' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे तातडीने सुरू करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'ताउक्ते' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे तातडीने सुरू करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

अलिबाग : "ताउक्ते" चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व तहसिलदारांना दिले आहेत.  जिल्हयात "ताऊक्ते" चक्रीवादळामुळे झालेल्या घर, गोठे, शेती व सार्वजनिक मालमत्ता यांचे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी. तसेच मृत व्यक्ती, मृत जनावरे यांच्याबाबतही संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरीत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत.