तो 'दाढीवाला चोर कोण' त्याचे नाव आशिष शेलारांनी जाहीर करावं !

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तो 'दाढीवाला चोर कोण' त्याचे नाव आशिष शेलारांनी जाहीर करावं !

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाष्यानंतर 'चोर के दाढीमे तिनका' असे वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहे मात्र त्यांनी 'दाढीवाला चोर कोण' आहे त्याचे नाव काय आहे हे त्यांनी जाहीर करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
 शरद पवार यांनी २०१३ साली युपीए सरकारच्या काळात सहकाराला घटनात्मक सुचित टाकून स्वायत्तता देण्याचे काम केले.परंतु या स्वायत्ततेवर कोण गदा आणत असेल तर त्यावर नंतर बोलू मात्र कायद्याचे राज्य असते. कायद्यापेक्षा कुणी मोठे नाही.एखादा व्यक्ती मंत्री झाला म्हणून सर्व अधिकार मिळतात असे नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जबाबदारीने बोलावे असा इशारा मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'दोन मुलांचे' धोरण,अमित शहा यांच्या सहकार खात्याबद्दल भाजपकडून देण्यात येत असलेल्या धमक्या आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही मलिक यांनी भाष्य करत सबुरीचा सल्ला दिला. उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार 'दोन मुलांचे' धोरण आणत आहे. हे धोरण महाराष्ट्रात २००० मध्येच तयार करण्यात आलेले आहे. मात्र योगी आदित्यनाथ 'दोन मुले' हे धोरण आणून संपूर्ण देशात गोंधळ घालत आहेत त्यांनी दोन मुलांऐवजी भाजप नेत्यांच्या वक्तव्यानुसार जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे असा घणाघाती आरोप  मलिक यांनी केला.दोन मुलांच्यावर मुल झाले तर त्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा शासकीय लाभ घेता येत नाही हे महाराष्ट्रात धोरण ठरलेले आहे याची आठवणही मलिक यांनी योगींना करुन दिली.
भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत त्यांना मुलं नाहीत.किंवा भाजपची मातृसंस्था आरएसएसमध्येसुध्दा असे लोक आहेत ज्यांना मुलेच नाहीत. दोन मुलं ही पॉलिसी -याच राज्यात आहे. त्यामुळे योगींनी 'मुलं नकोत' ही पॉलिसी अंमलात आणली पाहिजे कारण मुलं नाहीत त्यांना प्रोत्साहन मिळेल असा टोलाही  मलिक यांनी लगावला. भाजपचे साक्षी महाराज असतील किंवा त्यांच्यासारखे अनेक लोक आहेत.जे जास्त मुलं जन्माला घाला अशी सारखी - सारखी वक्तव्य करत आहेत. त्यांचे ऐकून योगी यांनी योजना  निर्माण करावी असा सल्लाही  मलिक यांनी दिला.कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहितीच्या अभावी आरोप केला आहे असा टोला मलिक यांनी लगावला आहे. पटोले यांनी त्यांच्या हालचालीवर कार्यक्रमावर पाळत असल्याचे म्हटले आहे.ही माहिती गृहमंत्रालय,उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पुरवते असा आरोप केला आहे. त्यावर बोलताना मलिक यांनी राज्यात सरकार कुणाचेही असो राजकीय कार्यक्रम,आंदोलने, बैठका किंवा महत्त्वाचे नेते,मंत्री त्यांच्या हालचालीची नोंद ठेवण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक असते. ते सर्व पक्षांची माहिती संकलित करून ती खात्यांतर्गत अहवाल त्यार करत असतात आणि संकलित माहिती गृहखात्याकडे दिली जाते.ही प्रक्रिया पटोले यांना माहीत नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चौहान यांच्याकडून माहिती करून घेतली पाहिजे. जर  पटोले यांना वाटत असेल की, त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस नको, त्यांच्या नेत्यांना, मंत्र्यांना पोलीस बंदोबस्त नको तर त्यांनी तशी मागणी करावी त्यावर गृहमंत्री काय तो निर्णय घेतील असेही मलिक म्हणाले