कर्णधारपद सोडण्यासाठी विराटवर कोणताही दबाव नव्हता”, भारताच्या माजी क्रिकेटपटूनं केलं स्पष्ट!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कर्णधारपद सोडण्यासाठी विराटवर कोणताही दबाव नव्हता”, भारताच्या माजी क्रिकेटपटूनं केलं स्पष्ट!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. विराट कोहलीनं आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या निर्णयावर क्रिकेट विश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय संघातील माजी अनुभवी अष्टपैलू खेळाडू मदनलाल यांनी विराटच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

मदनलाल यांनी विराट कोहलीच्या टी -२० मधील कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. विराटवर कर्णधारपद सोडण्याचा कोणताही दबाव नव्हता असे मदनलाल यांनी म्हटले आहे. हा सर्व निर्णय कामाच्या ओझ्याबद्दल आहे असे त्यांनी म्हटले. कोहलीच्या या विराट निर्णयावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मदनलाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“त्याच्यावर असा कोणताही दबाव नव्हता आणि मी त्याच्या निर्णयाचे कौतुक करतो. तो आज क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आयपीएल) कर्णधारही आहे. कामाचा ताण लक्षात घेता हा त्याचा चांगला निर्णय आहे. तो सध्या त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर आहे, जे त्याच्यासाठी आणि संघासाठी चांगले आहे,” असे मदनलाल यांनी म्हटले आहे.