मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, १८ जून (हिं.स.) : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत दोन दिवस (१८ आणि १९ जून) मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहेत. यावेळी सोसाट्याचा वाराही सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.

 

मुंबई, मुंबई उपनगर आणि वसई-विरार परिसरातही सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. विरार पूर्वमधील काही भाग जलमय झाला होता. अशावेळी पुढील काही तास मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. यातील काही भागात सकाळपासून सुमारे १६० ते १८० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे