टी-२० वर्ल्डकपबाबत जय शाह यांचं मोठं विधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टी-२० वर्ल्डकपबाबत जय शाह यांचं मोठं विधान

भारतातील क्रिकेट चाहत्यांना नाराज करणारी बातमी समोर आली आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी याबाबत अंतिम घोषणा केली. ते म्हणाले, ”आम्ही भारतात होणाऱ्या २०२१ टी-२० वर्ल्डकपला संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवत आहोत. या संदर्भात आज आम्ही आयसीसीला माहिती देणार आहोत. टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक आयसीसी ठरवेल.”

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील. करोनामुळे आयपीएल २०२१ची उर्वरित स्पर्धाही यूएईत ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबरला असणार आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार आहे.

ईएसपीएनच्या अहवालानुसार टी-२० वर्ल्डकप दोन फेऱ्यांमध्ये खेळला जाईल. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. या अहवालानुसार, राऊंड मध्ये १२ सामने होणार असून त्यामध्ये संघ भिडणार आहेत. पैकी संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. सुपर १२ साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे.