कांदळवन क्षेत्र संवर्धन व संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा - आदित्य ठाकरे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कांदळवन क्षेत्र संवर्धन व संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा - आदित्य ठाकरे

मुंबई  : मुंबईठाणेपालघररायगड क्षेत्रातील कांदळवन क्षेत्र सुरक्षित आणि संवर्धित करणे गरजेचे असूनसंरक्षणासाठी अतिरिक्त मनुष्यबळासोबतच सीसीटीव्ही किंवा तत्सम अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल ? याचा अभ्यास करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करावा, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.             अद्यापही इतर काही शासकीय यंत्रणांच्या ताब्यात असलेले कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. भारतीय वन अधिनियम कलम 20 अंतर्गत अधिसूचना जारी करण्यावर प्रलंबित क्षेत्राची चौकशी जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.            

 मुंबईतील ३९४८.५० हेक्टर पैकी ३९२३.२७ हेक्टर क्षेत्रठाणे जिल्ह्यातील ३४५०.२२ हेक्टर पैकी ३०९४.०४ हेक्टर क्षेत्र , पालघर जिल्ह्यातील ३०७३.५९ हेक्टर पैकी २०५६.९३ हेक्टर क्षेत्र तर रायगड जिल्ह्यातील ४४१९.५१ हेक्टर पैकी २९९७.७० हेक्टर क्षेत्र संवर्धनासाठी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले असल्याची माहिती तसेच मुंबई उपनगरात विविध ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतींचेही काम पुर्णत्वास येत असल्याचेही माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.             

या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डीकांदळवनचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारीमुख्य वनसंरक्षक अरविंद आपटेसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे वन संरक्षक मल्लिकार्जुनमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकरकांदळवनचे उपवनसंरक्षक निनु सोम राजवन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे आदी उपस्थित होते