ओम देणार का प्रेमाची कबुली?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ओम देणार का प्रेमाची कबुली?

एका गोड नात्याची कथा सांगणारी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका झी मराठीवर आली आणि
अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. रसिक प्रेक्षकांनी मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा,
चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अन्विता फलटणकर आणि
शाल्व किंजवडेकर या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे.
मोहित आणि आईकडून पदोपदी अपमान होऊन सुद्धा मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा होतोय, किंबहुना नलू
मावशीचा हा हट्टच आहे. चिन्या आणि रॉकी हा साखरपुडा होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत.
अखेर तो दिवस येतो आणि साखरपुड्याच्या दिवशी मोहीतला आणि त्याच्या आईला जाणवत की स्वीटूचे लक्ष या
सोहोळ्यात नसून ती वेगळ्याच विचारात आहे. ओम आणि स्वीटूमध्ये काहीतरी सुरु आहे. हे कुठेतरी मोहित आणि
त्याच्या आईला पचनी पडत नाहीये. म्हणून त्या स्वीटूवर नको नको ते आरोप करतात. या सगळ्यात ओम मध्ये
पडून स्वीटू कशी निर्दोष आहे हे पटवून देतो आणि पुन्हा एकदा आपलं स्वीटूवर प्रेम असल्याची कबुली देतो. या
प्रेमाच्या कबुलीनंतर मालविकाचा प्रचंड संताप होतो.