मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा आहे - नवाब मलिक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुख्यमंत्र्यांच्या  कार्यपद्धतीवर  प्रश्नचिन्ह  निर्माण  केल्याचे  जे चित्र उभे केले जातेय ती अफवा आहे - नवाब मलिक

मुंबई दि. २७ : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा आहे असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. कुठल्याही मंत्र्यांनी कार्यपद्धतीवर कुठलेही प्रश्न निर्माण केलेले नाही. सरकार एकजुटीने काम करतेय असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

 पवारसाहेबांची व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसह लसीकरण, लॉकडाऊन व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. शिवाय पक्षाचे नेते पवारसाहेबांना भेटले की, पवारसाहेब राजकीय परिस्थितीवर मंत्र्यासोबत चर्चा करत राहतात असेही नवाब मलिक यांनी सांगितले.