कोल्हापूरसह कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांच्या पूरस्थितीत मदतीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क - वडेट्टीवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोल्हापूरसह कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांच्या पूरस्थितीत मदतीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क - वडेट्टीवार

मुंबई  : रत्नागिरी,पालघर,रायगड,कोल्हापूर व ठाणे जिल्हयातील पुरस्थितीत मदतीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत सर्व तैनात असलेल्या यंत्रणा सध्या युध्दपातळीवर काम करत आहेत.रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयात एनडीआरएफ च्या प्रत्येकी दोन अशा एकूण चार पथके रवाना होत आहेत.तर ठाणे येथे तीन व पालघर येथे एक टीम पोहचली आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, कोयना धरणातून होणा-या पाण्याचा विसर्ग व वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण व खेड या शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे.पुरामुळे प्रभावीत झालेल्या भागातील मदतीसाठी एनडीआरएफ च्या टीम लवकरच पोहचेतील यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील आहे.तसेच जिल्हाधिकारी यांनी कोस्टगार्ड व वायुदलाचीही मागणी केली आहे.  मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, रायगड जिल्हयातील कर्जत व महाड हा परिसरही जलमय झालेला आहे.तेथील जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहिती नुसार सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे.कोल्हापूर जिल्हयातही मुसळधार पावसामुळे शाहुवाडी व गगनबावडा तालुक्यातील काही परिसर जलमय झालेला आहे.सिंधुदुर्गला गगनबावडयामार्गे होणारी वाहतूक थांबवली आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार, सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे.या भागातही एनडीआरएफ ची दोन पथके मदतीसाठी रवाना झाली आहेत. ठाणे जिल्हयात झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण व भिंवडी काही परिसरात पाणी साचले आहे.या भागात मदतीसाठी एनडीआरएफची तीन पथके टीम मदतीसाठी पोहचली आहेत.या भागातही पाऊसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थीती नियंत्रणात येत आहे असेही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.
मुंबईत दोन एनडीआरएफच्या टीम असून एक टीम नागपूर मध्ये तर सात टीम पुणे येथे आहेत.जिल्हयामधील सर्व यंत्रणांकडून तात्काळ नागरिकांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.