राजकीय ऑटोचे कुणी स्क्रॅप सुद्धा विकत घेणार नाही- बावनकुळे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राजकीय ऑटोचे कुणी स्क्रॅप सुद्धा विकत घेणार नाही- बावनकुळे

अकोला: नारायण राणे यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राच्या हातामध्ये बटन येईल त्या तीन चाकाच्या ऑटोचे वाईट हाल होणार आहे ऑटोचे की स्क्रॅप सुद्धा मार्केटमध्ये विकत घेणार नाही, असे टोला भाजपचे सरचिटणीस तथा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला लावला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. पुढे ते म्हणाले, एक पोलिस आयुक्त पत्र लिहतो, नारायण राणे साहेबांना अटक करण्याकरिता जी पद्धती वापरण्यात आली जसे की ते शिवाजी महाराजांसारकीजे आहेत. एक पोलिस आयुक्त असे म्हणतो की, कोणतेही गुन्हे दाखल करा, नियमात बसत नसेल तरीही गुन्हे दाखल करा, असे म्हणतो आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. म्हणजे काय लावले आहे, पोलिस हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत, काही ठिकाणी शिवसेनेचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील पोलिस कधीही असा नव्हता. जगातील उत्तम पोलिस महाराष्ट्रातील आहे, असेही ते म्हणाले.
उद्या राज्य आमचं आलं तर आम्ही असं करायचं, त्यांचं आलं तर त्यांनी तसं करायचं. काय होईल महाराष्ट्राचे. त्यामुळे या पूर्ण घटनेवर लोक लक्ष देऊन आहेत. 12 कोटी जनता ही आंधळी नाही, सुसंस्कृत आहे. योग्यवेळी निर्णय करेल आणि उभ्या महाराष्ट्रात दिसेल, असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांची शंभर कोटी संपत्ती जप्त केली. त्यावर छगन भुजबळ यांनी ही संपत्ती माझी नसल्याचे म्हणत असले तरी चौकशीच्यावेळी सर्व असेच म्हणत असतात, असेही ते म्हणाले. दरम्यान त्यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणसंदर्भात हे सरकार उदासीन असल्याचा आरोप केला आहे. तसेच पुढील निवडणुका या एसटी एससी आणि ओपन करायच्या आहेत. म्हणजे बलाढ्य व श्रीमंत व्यक्तीला ओबीसीच्या गरीब जागेवर लढवायची आहे. या सरकारला ओबीसींवर अन्याय करायचा आहे, असे दिसतेय. या अन्याय करायचा नसेल तर अजूनही वेळ आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात ओबीसींचा डेटा तयार होऊ शकतो. डिसेंबरला आरक्षण टाकता येऊ शकतो. फेब्रुवारी, मार्चच्या महापालिकेच्या निवडणुकीत हे आरक्षण लागू शकते, असेही ते म्हणाले. परंतु, या सरकारला असे करायचे नाही आहे, असा आरोप केला. या पत्रकार परिषदेला आमदार गोवर्धन शर्मा, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, महापौर अर्चना मसने, शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह आदी उपस्थित होते.