मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू

मुंबई, : मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा अखेर मृत्यू झाला आहे. या संदर्भात मुलाच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरण मंचर पोलिसांकडे हस्तांतरीत केले आहे.

काय आहे पार्श्र्वभूमी
शेतकरी सुभाष जाधव यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गावातील सावकार विलास साधू शिंदे आणि सुशीला सुरेश जाधव यांच्याकडून पाच लाख रुपये पाच टक्के व्याज दराने कर्ज घेतले होते. मात्र हे पैसे सावकार विलास शिंदे यांना दिल्यामुळे त्यांनी जाधव यांच्या घराची तोडफोड केली होते आणि कुटुंबासोबत मारहाण केली होती. या संदर्भात जाधव यांनी स्थानिक मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी कारवाई केल्यामुळे जाधव यांनी २० ऑगस्टला मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र मंत्रालयाबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांनी आतमध्ये प्रवेश दिल्यामुळे जाधव यांनी विष पिऊन मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ जाधव यांना उपचारासाठी जीटी रुणालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर जाधव यांचा मुलगा गणेशच्या तक्रारीवरून मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुण्यातील मंचर पोलिसांकडे हस्तांतरीत केला आहे. या संदर्भात अधिक चौकशी मंचर पोलीस करणार आहेत.