भारताच्या समृद्ध परंपरेला जगमान्यता मिळाली- स्मृती ईराणी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली: योग ही भारताची प्राचिन परंपरा आणि वारसा आहे. सुमारे 7 वर्षांपूर्वी संपूर्ण जगाने योगदिनाच्या निमित्ताने भारतीय योग आत्मसात केल्याचे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जारी केलेल्या ट्वीटर संदेशात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात
ट्वीटर संदेशात, ईराणी म्हणाल्या की, “ सात वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय योगदिनामुळे, भारताच्या या सर्वांगीण आरोग्याच्या समृध्द वारशाला जागतिक स्तरावर मान्यता आणि प्रतिष्ठा मिळाली. यंदाच्या योगदिनाची संकल्पना, “कल्याणसाठी योगाभ्यास’ सध्याच्या परिस्थितीत अत्यंत चपखल आहे. चला आपण सगळेच आपल्या एकूण मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी दैनंदिन आयुष्यात योगाभ्यासाचा अंगीकार करण्याचे आवाहन ईराणी यांनी केले.