“…तू असं बोलायला नको होतं”; हरभजनच्या वक्तव्यावर गौतमची गंभीर प्रतिक्रिया
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. दुसरीकडे क्रिकेटपटूंनी देखील नीरजला शुभेच्छा दिल्या. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंह यांनी विजय क्रिकेट विश्वचषक २०११ पेक्षा मोठा असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने हा व्हिडिओ रिट्वीट करत “असं बोलयला नको होतं”, असं पोस्ट लिहिली आहे. गौतम गंभीरने ही पोस्ट गंमतीशीर शैलीत लिहिली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षानंतर कांस्य पदक पटकावल्यानंतर गौतम गंभीरनेही असंच एक ट्वीट केलं होतं. त्यानंतर तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. त्याच्या ट्वीटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
क्रिकेटपटू हरभजन सिंहने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरजचं कौतुक केलं. “हे सुवर्ण पदक २०११ विश्वचषकाहून मोठा विजय आहे. २०११ विश्वचषकाच्या तुलनेत याचा आनंद ५० टक्के अधिक साजरा केला पाहीजे”, असं मत हरभजन सिंह याने नोंदवलं होतं. हरभजनच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ गौतम गंभीरने रिट्वीट करत स्माइलीसह पोस्ट लिहिली आहे. “खरं आहे हरभजन सिंह…पण तू असं बोलायला नको होतं! तू असं असं बोलायला नको होतं! तू असं बोलायला नको होतं!”, असं ट्वीट गौतम गंभीरने केलं आहे.