आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली, : आगामी टी२० विश्वचषकासाठी (वर्ल्ड कप) बीसीसीआयने बुधवारी रात्री कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
स्टँडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर
१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युएई आणि ओमानच्या मैदानात टी २० विश्वचषक सामने खेळवले जाणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून या दोन्ही संघाशिवाय न्यूझीलंड आणि अफगानिस्तान यांचाही या गटात समावेश आहे. पहिल्या गटात गत वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.